अजीम प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप, सुनिलभाऊ चौधरी व मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम; शिक्षणाला प्रोत्साहन देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन
![]()
अजीम प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप
सुनिलभाऊ चौधरी व मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम; शिक्षणाला प्रोत्साहन देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन
अमळनेर प्रतिनिधी
समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अजीम प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त सुनिलभाऊ चौधरी व मित्र परिवार, अमळनेर यांच्या वतीने माध्यमिक विद्यालय, निंभोरा येथील गरजू विद्यार्थ्यांना नवीन दप्तरांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे हास्य फुलले.
शैक्षणिक साहित्याचा अभाव हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळा ठरू नये, या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणाऱ्या दप्तरांचे वितरण झाल्याने त्यांच्यात शिक्षणाबाबत नवचैतन्य निर्माण झाले.
। कार्यक्रमास सुनिलभाऊ चौधरी, मित्र परिवारातील सर्व पदाधिकारी तसेच अप्पासो. शेखर श्रीराम धनगर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत, प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयीची आवड वाढते आणि त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
। या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल माध्यमिक विद्यालय निंभोरा येथील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुनिलभाऊ चौधरी, मित्र परिवारातील सर्व पदाधिकारी तसेच अप्पासो. शेखर श्रीराम धनगर यांचे मनःपूर्वक आभार मानले. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या हितासाठी अशाच समाजोपयोगी आणि प्रेरणादायी उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
अजीम प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने शिक्षणाबरोबरच सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देत उपस्थितांकडून विशेष कौतुकाची थाप मिळविली.

