आदर्श प्र. केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक बापूसाहेब यशवंत शामराव शिंदे यांचा गौरवशाली सेवापूर्ती सोहळा
1 min read

आदर्श प्र. केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक बापूसाहेब यशवंत शामराव शिंदे यांचा गौरवशाली सेवापूर्ती सोहळा

Loading

जाहिरात..

 

 

 

 

 

 

 

 

 

आदर्श प्र. केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक बापूसाहेब यशवंत शामराव शिंदे यांचा गौरवशाली सेवापूर्ती सोहळा

अमळनेर प्रतिनिधी

दि. ३१ जुलै २०२६ हा दिवस कंकराज (ता. पारोळा, जि. जळगाव) येथील शैक्षणिक क्षेत्रासाठी भावनांचा संगम ठरला. आनंद आणि विरह या दोन भावनांचा अनोखा मिलाफ अनुभवत, आदर्श प्रभारी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक बापूसाहेब यशवंत शामराव शिंदे यांनी तब्बल ३७ वर्षे ५६ दिवसांच्या निष्कलंक, कर्तव्यनिष्ठ आणि आदर्श सेवेनंतर शासकीय सेवेतून सन्मानाने निवृत्ती स्वीकारली.

५ जून १९८९ रोजी अमळनेर तालुक्यातील अंबारे या छोट्याशा गावातून सुरू झालेला हा ज्ञानप्रवास चौबारी, सात्री, कंकराज, मालपूर आणि पुन्हा कंकराजपर्यंत पोहोचला. प्रत्येक ठिकाणी त्यांनी केवळ शिक्षक म्हणून नव्हे, तर संस्कारवंत समाज घडवणारे शिल्पकार म्हणून आपली अमिट छाप उमटवली.

> “ज्ञानाचा दीप लावणारा कधी निवृत्त होत नाही,
त्याच्या प्रकाशात हजारो आयुष्ये उजळत राहतात.”

बापूसाहेब शिंदे हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभे राहते ते साधेपणा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचा सुंदर संगम. विद्यार्थ्यांच्या यशात आनंद मानणारा, शिक्षकांना प्रेरणा देणारा, पालकांचा विश्वास संपादन करणारा आणि समाजाला आपलेसे करणारा हा आदर्श व्यक्तिमत्त्वाचा प्रवास आज प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत शिस्त आणि पारदर्शकता हीच ओळख राहिली. कोणताही भेदभाव न करता प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्याला समानतेची वागणूक देत त्यांनी संस्थेला कुटुंबाची ऊब दिली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न, शिक्षकांना दिलेले मार्गदर्शन आणि शिक्षण क्षेत्रात रुजवलेली मूल्ये आजही अनेकांच्या जीवनाला दिशा देत आहेत.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक सुंदर पैलू म्हणजे त्यांची माणुसकी. घरात आलेला प्रत्येक पाहुणा आपलाच आहे, या भावनेने त्यांनी प्रत्येकाचे स्वागत केले. मित्रांसाठी जीव ओवाळून टाकणारे, संकटात धावून जाणारे आणि समाजासाठी सदैव तत्पर राहणारे बापूसाहेब हे अनेकांच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण करून गेले.
या यशस्वी प्रवासामागे त्यांच्या जीवनसाथी सौ. भारती यशवंत शिंदे यांची मोलाची साथ लाभली. स्वतः शिक्षिका आणि माजी चेअरमन असलेल्या भारतीताईंनी कुटुंब, संसार आणि सामाजिक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत बापूसाहेबांच्या प्रत्येक पावलावर खंबीर साथ दिली. खऱ्या अर्थाने ही यशोगाथा दोघांच्या समर्पणाची आहे.

“कर्तव्याच्या वाटेवर चालणारे थकत नाहीत कधी,
त्यांची पाऊलखूणच पुढच्या पिढीची दिशा ठरते.”

बापूसाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे गाठली. अनेक शिक्षकांना प्रेरणा मिळाली. अनेक शाळांनी गुणवत्ता, शिस्त आणि संस्कारांचा नवा आदर्श निर्माण केला. त्यांच्या मार्गदर्शनाने असंख्य जीवनांना नवी दिशा मिळाली. त्यामुळे आज त्यांची सेवापूर्ती हा केवळ एका अधिकाऱ्याचा निरोप नसून, एका सुवर्ण पर्वाचा गौरवशाली समारोप आहे.

आज कागदोपत्री सेवा संपली असली तरी त्यांचे विचार, संस्कार, कार्यपद्धती आणि माणुसकीचा वारसा कायम जिवंत राहणार आहे. निवृत्ती हा शेवट नसून समाजसेवा, संस्कृती संवर्धन आणि नव्या उमेदीने जीवन जगण्याच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात आहे.

ईश्वरचरणी प्रार्थना की बापूसाहेब आणि सौ. भारतीताईंना उत्तम आरोग्य, आनंद, समाधान, दीर्घायुष्य आणि समृद्ध जीवन लाभो. त्यांच्या आयुष्याची ही दुसरी इनिंगही तितकीच प्रेरणादायी, यशस्वी आणि समाजोपयोगी ठरो.
मानाचा मुजरा

“आपण फक्त मुख्याध्यापक नव्हता…
आपण माणूस घडवणारे शिल्पकार होता.
आपली सेवा संपली असेल,
परंतु आपला आदर्श कधीच संपणार नाही.”

शुभेच्छुक :
श्री. आबासाहेब गोकुळ पाटील
माजी केंद्रप्रमुख, पंचायत समिती अमळनेर, जि. जळगाव

ताईसौ. प्रमिला पाटील
आदर्श अंगणवाडी सेविका, रामेश्वर, ता. अमळनेर, जि. जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *