गुरु रविदास जयंतीनिमित्त जळगावात समता रॅली, सत्कार सोहळे व सामाजिक उपक्रमांचा जल्लोष , चर्मकार विकास संघाच्या आयोजनास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
1 min read

गुरु रविदास जयंतीनिमित्त जळगावात समता रॅली, सत्कार सोहळे व सामाजिक उपक्रमांचा जल्लोष , चर्मकार विकास संघाच्या आयोजनास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Loading

गुरु रविदास जयंतीनिमित्त जळगावात समता रॅली, सत्कार सोहळे व सामाजिक उपक्रमांचा जल्लोष

चर्मकार विकास संघाच्या आयोजनास समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगांव प्रतिनिधी :
सामाजिक समतेचे प्रणेते, जगतगुरु संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६४९ व्या जयंतीनिमित्त जळगाव येथील चर्मकार विकास संघातर्फे विविध सामाजिक कार्यक्रम उत्साहात आणि मोठ्या जनसहभागात पार पडले. नेरी नाका जवळील श्री. वानखेडे गुरुजी हाउसिंग सोसायटी परिसरात सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत समाजजागृती, एकजूट आणि समतेचा संदेश देणारे उपक्रम राबविण्यात आले.

– प्रतिमा पूजनाने आणि बाईक रॅलीने उत्साहपूर्ण प्रारंभ

कार्यक्रमाची सुरुवात रेल्वे स्टेशन परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जगतगुरु संत रविदास यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली.
या वेळी गटई कामगार श्री. मोहन डांबरे, गटशिक्षणाधिकारी श्री. विजय पवार, प्रदेश उपाध्यक्ष श्री. विश्वनाथ सावकारे, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री. संजय वानखेडे, ॲड. श्री. चेतन तायडे, जिल्हाध्यक्ष डॉ. अर्जुन भारुळे, महानगर अध्यक्ष श्री. कमलाकर ठोसर आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर काढण्यात आलेल्या भव्य समता बाईक रॅलीने शहर दणाणून गेले. पिवळे ध्वज, केसरी टोपी आणि “मन चंगा तो कठोती मे गंगा”, “जय जय गुरु रविदास” अशा घोषणांनी परिसर भारावून गेला. नेहरू चौक, शिवाजी चौक, स्वातंत्र्य चौक, काव्यरत्नावली चौक, डी-मार्ट, सिंधी कॉलनी, पंचमुखी हनुमान मंदिर मार्गे रॅलीने समाज मंदिरात समारोप केला.

मान्यवरांच्या हस्ते सत्कार सोहळा

समारोप कार्यक्रमात जळगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. राजुमामा भोळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
नुकत्याच जळगाव महानगरपालिकेत यश मिळवल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच नगरसेविका सौ. सुरेखाताई तायडे व श्री. नितीनभाऊ तायडे यांचाही सन्मान करण्यात आला.

“संघटित व्हा, समाज विकास घडवा” — आमदार भोळे यांचे आवाहन

आपल्या भाषणात आमदार भोळे यांनी गुरु रविदास जयंतीच्या शुभेच्छा देत सांगितले की,
“गुरु रविदासांनी दिलेली समतेची शिकवण अंगीकारून समाजाने संघटित व्हावे आणि प्रगतीच्या वाटेवर चालावे.”
तसेच संत रविदास चौक व समाज मंदिर सभागृह अद्ययावत करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

गुरु रविदासांच्या विचारांचा विज्ञानवादी संदेश

व्याख्याते श्री. सुरेश कुलकर्णी यांनी संत रविदास यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या समता, बंधुता आणि विज्ञानवादी दृष्टिकोनाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.

शेकडो कार्यकर्त्यांचे योगदान

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. वसंतराव नेटके, श्री. विश्वनाथ सावकारे, श्री. संजय वानखेडे, डॉ. अर्जुन भारुळे, ॲड. चेतन तायडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. महिलांचीही लक्षणीय उपस्थिती होती.

भावपूर्ण श्रद्धांजली

कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार तसेच सोसायटी सभासद श्री. किशोर तायडे यांच्या अकाली निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

अल्पोपहाराने सांगता
कार्यक्रमाची सांगता उपस्थित समाजबांधवांना चहापान व अल्पोपहार देऊन करण्यात आली.
ही जयंती फक्त उत्सव नव्हे तर समता, संघटन आणि सामाजिक जागृतीचा प्रेरणादायी सोहळा ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *