अमळनेरला मिळतंय वरदान — १९७ कोटींची २४×७ पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात    ३० वर्षांनंतर अमळनेरमध्ये विकासाची मोठी क्रांती – शहराचा बदलता चेहरा
1 min read

अमळनेरला मिळतंय वरदान — १९७ कोटींची २४×७ पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात  ३० वर्षांनंतर अमळनेरमध्ये विकासाची मोठी क्रांती – शहराचा बदलता चेहरा

Loading

अमळनेरला मिळतंय वरदान — १९७ कोटींची २४×७ पाणीपुरवठा योजना अंतिम टप्प्यात

३० वर्षांनंतर अमळनेरमध्ये विकासाची मोठी क्रांती – शहराचा बदलता चेहरा

 

अमळनेर (प्रतिनिधी)- अमळनेर शहराचा सर्वांगीण विकास, बदलणारा चेहरा आणि नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अमळनेर तालुका व शहर विकास आघाडी भक्कमपणे काम करत आहे. माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील, खासदार स्मिताताई वाघ व माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली शहराच्या विकासाचा मोठा रोडमॅप आकार घेत आहे.

*शहराला वरदान ठरणारी १९७ कोटींची २४×७ पाणीपुरवठा योजना-*
अमळनेर शहराचा दीर्घकाळाचा पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी पाडळसे धरणावरून २४ तास शुद्ध पाणीपुरवठा करणारी १९७ कोटींची महत्त्वाकांक्षी योजना वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. ही योजना राबविण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करत राज्य-केद्रीय यंत्रणांकडून मंजुरी मिळवली. या प्रकल्पामुळे अमळनेरकरांचे पाण्यासाठीचे दिवसेंदिवस वाढणारे हाल अखेर संपणार असून शहराला चोवीस तास पाण्याची उपलब्धता होणार असून ही मोठी क्रांती ठरणार आहे.

*अमळनेर शहराचा सर्वांगीण विकास ३० वर्षांत प्रथमच मोठा बदल*-

अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीने नगराध्यक्षांसह सर्व १८ प्रभागांमध्ये विकासाभिमुख, तळागाळातील सामान्य जनतेचे प्रश्न जाणणारे, २४ तास स्थानिक उपलब्ध राहून काम करणारे उमेदवार दिले आहेत. यापैकी एका नगरसेवकाची बिनविरोध निवड झाली असून आघाडीने विजयाची मुहूर्तमेढ रोवली आहे.

*विरोधी पक्षाचा पराभव निवडणुकीपूर्वीच-*
विरोधकांना संपूर्ण ३६ जागांवर उमेदवारही उभे करता आले नसल्याने त्यांनी लढाई सुरू होण्याआधीच शरणागती पत्करली आहे. स्थानिक नेतृत्वावर जनतेचा विश्वास नसल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा नंदुरबार पॅटर्नवरून बाहेरचा उमेदवार शहरावर लादण्याचा प्रयत्न केला. परंतु अमळनेरची सुजाण व जागरूक जनता हे षडयंत्र ओळखून पुन्हा एकदा त्यांना घरीच बसवणार हे स्पष्ट दिसत आहे.

*उत्स्फूर्त प्रतिसादातून आघाडीचा प्रचंड विजय निश्चित-*
लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र (जितुभाऊ) ठाकूर तसेच प्रभागातील सर्व उमेदवारांना मिळत असलेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीचा ऐतिहासिक विजय निश्चित झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

*अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे उद्दिष्ट स्पष्ट आहे-* अमळनेरचा सर्वांगीण विकास, पाणी, रस्ता, पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यावर भक्कम काम, युवकांसाठी संधी आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण ज्यामुळे अमळनेर शहर आता नवीन प्रगतीच्या वाटेवर साहसी पावले टाकत आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *