भजनी मंडळांसाठी शासनाचा अनुदान निर्णय स्वागतार्ह, पण अटींनी घातली अडचण
1 min read

भजनी मंडळांसाठी शासनाचा अनुदान निर्णय स्वागतार्ह, पण अटींनी घातली अडचण

Loading

भजनी मंडळांसाठी शासनाचा अनुदान निर्णय स्वागतार्ह, पण अटींनी घातली अडचण

शिंदखेडा प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाने राज्यातील भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून ही योजना कौतुकास्पद आहे. मात्र, या अनुदानासाठी शासनाने लावलेल्या कठोर अटी व नियमांमुळे ग्रामीण भागातील अनेक भजनी मंडळांची दमछाक होत आहे.

भजनी मंडळ नोंदणी नसणे, मंडळाध्यक्षांचे आधार व पॅनकार्ड, ई-मेल आयडी, ग्रामपंचायतीचा दाखला, बँक खाते, आयएफसी कोड अशा कागदपत्रांची पूर्तता करणे ग्रामीण मंडळांसाठी अवघड ठरत आहे. त्यामुळे शासनाने या अटी शिथिल करून खरी मंडळे व भजन परंपरेला मदत करावी, अशी मागणी शिंदखेडा तालुका वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. पांडुरंग पुना माळी यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भजन व संस्कृतीला नवसंजीवनी देण्यासाठी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असला, तरी मंडळांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी नियम सोपे करणे अत्यावश्यक असल्याचे मत परिषद पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

चौकट

“महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र नियम व अटी शिथिल करून खरी भजनी मंडळे या योजनेचा लाभ घेऊ शकतील, यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा.”
– पांडुरंग माळी, अध्यक्ष शिंदखेडा तालुका वारकरी साहित्य परिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *