ओमकार नगरच्या समस्यांचा विळखा: प्रशासनाकडे उपाययोजनांची अपेक्षा! मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन
![]()
ओमकार नगरच्या समस्यांचा विळखा: प्रशासनाकडे उपाययोजनांची अपेक्षा!
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन
अमळनेर प्रतिनिधी
ओमकार नगरमध्ये गटारी, स्वच्छता, पथदिवे आणि उद्यानांच्या देखभालीवर गंभीर दुर्लक्ष झाले आहे. जगप्रसिद्ध मंगळ मंदिराकडे जाणारा धरणगाव रस्त्याचा दर्जा निकृष्ट झाला आहे, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे. रस्त्यावर पाणी साचून रहदारीस त्रास होत आहे, आणि परिसरातील मोठी बाग निश्चयाने सुविधांपासून वंचित आहे. रहिवाश्यांनी याबाबत नगर परिषदेला वेळोवेळी निवेदन दिले असून, तातडीने उपाययोजना न झाल्यास कर न भरण्याचा इशारा दिला आहे.तरी मुख्याधिकारी साहेब तुषार नेरकर यांनी या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा रहिवाश्यांकडून करण्यात आली आहे.

