ठाणे येथील राज्यस्तरीय काव्य संमेलनात बापूराव ठाकरे पुरस्काराने सन्मानित
![]()
ठाणे येथील राज्यस्तरीय काव्य संमेलनात
बापूराव ठाकरे पुरस्काराने सन्मानित
अमळनेर प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळचे वतीने ठाणे मराठी ग्रंथालय सभागृह येथे झालेल्या शानदार सोहळ्यात बापुराव पाटील(अमळनेर)यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार व चेतन पणेर(नाशिक) यांना पत्रकार भूषण पुरस्कार मान्यवरांचे हस्ते सन्मानपूर्वकप्रदान करण्यात आले.
या संमेलनात प्कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक म्हणून सिद्धेश्वर कोळी.
,स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश धुमटकर, कवी संमेलन अध्यक्षा शांता गिरबने. घनश्याम पांचाळ, सिधार्थ कुलकर्णी, ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे, ज्येष्ठ कवी राजेश थळकर, सुधाकर सुसलादी, विद्या थोरात काळे , विद्या वाहुळे आदी मान्यवर उपस्थित होते सूत्र संचालन अनधा जाधव यांनी केले. यावेळी कोळी दिनानिमित्त ३० कवींनी आगरी कोळी भाषेत कविता सादरीकरण केल्या.
बापूराव ठाकरे यांचे अभिनंदन साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील,सचिव संदीप घोरपडे
व संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक संजीव पाटील,व्हॉइस मीडियाचे
, विभागीय अध्यक्ष,डॉ डिगंबर महाले,साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष संजय सुर्यवंशी,व्हाईस मिडीयाचे अमळनेर तालुकाध्यक्ष उमेश काटे,व सर्व कार्यकारणी सदस्य यांनी केले.

