“श्री गुरु तेग बहादुर शहीद समारंभानिमित्त साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न”
![]()
“श्री गुरु तेग बहादुर शहीद समारंभानिमित्त साने गुरुजी कन्या हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न”
अमळनेर (दि. १७ फेब्रुवारी २०२६, मंगळवार) – साने गुरुजी कन्या हायस्कूल, अमळनेर येथे श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या शहीद दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये देशभक्तीची भावना व महान विभूतींच्या कार्याविषयी आदर निर्माण व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. जे. एस. पाटील होते. व्यासपीठावर श्री. दिलीप पाटील, श्री. आर. एम. देशमुख, श्री. साळुंखे सर, श्री. मुकेश पाटील, श्री. दीपक महाजन व सौ. वंजारी मॅडम उपस्थित होते.
या वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. आपल्या प्रभावी भाषणातून विद्यार्थिनींनी श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या त्याग, देशभक्ती, धर्मसंरक्षण आणि साहित्यिक कार्याचा परिचय करून दिला. त्यांच्या अद्वितीय बलिदानामुळेच त्यांना “हिंद दी चादर” हा किताब मिळाला, याबाबतही विद्यार्थिनींनी प्रभावी विवेचन केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला:
🥇 प्रथम – रेणुका लाड (इयत्ता ९ वी ब)
🥈 द्वितीय – भूमिका पाटील (इयत्ता ९ वी अ)
🥉 तृतीय – उर्वशी महाजन (इयत्ता ८ वी ब)
🌟 उत्तेजनार्थ – आदिती पाटील (इयत्ता ८ वी
शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री. देशमुख सर व श्री. मुकेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थिनींचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात श्री. जे. एस. पाटील यांनी श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या अद्वितीय देशभक्तीचा व साहित्यिक योगदानाचा आढावा घेत, त्यांच्या बलिदानाचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगितले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. आबासाहेब हेमकांत पाटील व सचिव श्री. दादासाहेब संदीप घोरपडे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिलीप पाटील सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. दीपक महाजन सर यांनी केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली असून, शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेत आणखी एक उल्लेखनीय उपक्रमाची नोंद झाली आहे.

