मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर – यंदा 75 वी वर्षगांठ साजरी करणार; साहित्य, संस्कृती आणि समाजसेवेची अमूल्य परंपरा; त्रैवार्षिक निवडणुकीसाठी “अभिजात मराठी पॅनल” विजयी व्हावे अशी प्रबळ अपेक्षा
![]()
मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर – यंदा 75 वी वर्षगांठ साजरी करणार; साहित्य, संस्कृती आणि समाजसेवेची अमूल्य परंपरा; त्रैवार्षिक निवडणुकीसाठी “अभिजात मराठी पॅनल” विजयी व्हावे अशी प्रबळ अपेक्षा
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)– मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर हे शहराच्या सांस्कृतिक हृदयाचे प्रतिनिधित्व करणारी संस्था असून, त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अनवरत कामगिरी केली आहे. मंडळाच्या सक्रियतेत अनेक शारदी व्याख्यानमाला, सांस्कृतिक उपक्रम, साहित्यिक कार्यक्रम राबविण्यात आले असून अध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळ सदैव पुढाकार घेऊन सामाजिक व सांस्कृतिक बांधिलकीची नाळ मजबूत करत आहेत.
यंदा मंडळाची 75 वी वर्षगांठ साजरी होत आहे, आणि या खास प्रसंगी मंडळाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सांस्कृतिक, शैक्षणिक व साहित्यिक परंपरेला अधिक बळकट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मंडळाचे अध्यक्ष, संचालक मंडळ आणि विविध पदाधिकारी यापूर्वी अखिल भारतीय साहित्य संमेलन, शारदीय व्याख्यानमाला तसेच अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवून सदैव पुढे राहिले आहेत.
त्रैवार्षिक निवडणुकीसाठी 2 नोव्हेंबर 2025 रोजी मतदान होणार असून, साहित्यसेवेचा पतंग अधिक उंच झेप घेण्यासाठी “अभिजात मराठी पॅनल”चे 16 उमेदवार विजयी व्हावे अशी सर्व समाजातील नागरिकांकडून प्रबळ अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पॅनलमध्ये डॉ. जोशी अविनाश, श्री. भदाणे श्यामकांत, श्री. निकुंभ नरेंद्र, श्री. मगर भैय्यासाहेब, प्रा. पवार श्याम, श्री. पवार रमेश, प्रा. डॉ. माहेश्वरी सुरेश, श्री. भागवत बन्सीलाल, प्रा. डॉ. देसले वसंत, सौ. एकतारे स्नेहा, श्री. घोरपडे संदिप, सौ. लांडगे वसुंधरा, डॉ. पाटील महेश, श्री. पाटील नरेंद्र, प्रा. तुंटे विजय, श्री. वानखेडे चिंधु असे निष्ठावान व कार्यक्षम उमेदवार आहेत.
मराठी वाङ्मय मंडळाचे सर्व सदस्य, शिक्षक, साहित्यप्रेमी, शालेय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे की, आपल्या मतांनी या पॅनलच्या विजयी होण्यास हातभार लावा. यामुळे मंडळाची सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्ये पुढे नेण्यासाठी योग्य दिशा मिळेल आणि आगामी वर्षांमध्ये अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविता येतील.
मंडळाच्या सदस्यांनी सांगितले की, हे पॅनल सर्वदूर नागरिकांच्या विश्वासाचे प्रतीक असून, त्यांची कार्यशक्ती, अनुभव आणि नाविन्यपूर्ण विचार यामुळे मंडळाची 75 वी वर्षगांठ यावर्षी विशेष ठरेल आणि परंपरा अधिक उंचावेल.

