विद्यार्थी गुणवत्ता विकास, हाच शिक्षकांचा ध्यास आवश्यक*. *गटशिक्षणाधिकारी अजित तडवी*
![]()
*विद्यार्थी गुणवत्ता विकास, हाच शिक्षकांचा ध्यास आवश्यक*.
*गटशिक्षणाधिकारी अजित तडवी*
जळगांव प्रतिनिधी
विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याचा गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी, त्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे नव्हे तर शिक्षकांचा तो ध्यास असणे आवश्यक असल्याचे मत नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी अजित तडवी यांनी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने आयोजित सत्कार प्रसंगी व्यक्त केले.या प्रसंगी डॉ. मिलिंद बागुल तुळशीराम सोनवणे,मुख्याध्यापक उत्तम चिंचाळे,यांनी विद्यार्थी,शिक्षक यांना ऑनलाइन, आधार कार्ड बाबत व नोंदणी बाबत येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली शशिकांत राणे राजपूत, संतोष कचरे, सचिन जंगले, प्रेम झंवर, लक्ष्मण भूगवद्द्या,संभाजी अस्वार, आकाश बाजगीर,राहुल राजपूत सुनील भदाणे उपस्थित होते

