“बटाट्याच्या गोणपाटातून जगण्याची झुंज!”  महागाईच्या वणव्यात रोजगाराचा अभाव; अमळनेरातील दोन युवकांची संघर्षगाथा
1 min read

“बटाट्याच्या गोणपाटातून जगण्याची झुंज!” महागाईच्या वणव्यात रोजगाराचा अभाव; अमळनेरातील दोन युवकांची संघर्षगाथा

Loading

बटाट्याच्या गोणपाटातून जगण्याची झुंज!”

महागाईच्या वणव्यात रोजगाराचा अभाव; अमळनेरातील दोन युवकांची संघर्षगाथा

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)

“हाताला काम नाही, खिशात दमडी नाही, आणि जगण्याच्या महागाईचा वणवा दररोज भस्म करणारा…”
या ओळी केवळ कवितेपुरत्या मर्यादित नाहीत, तर त्या आजच्या समाजातील अनेक बेरोजगारांचे वास्तव प्रकट करतात. याच वास्तवाचं एक जिवंत चित्र पाहायला मिळालं अमळनेर शहरातील विजय स्टील समोरील रस्त्यावर – जिथे पिता व पुत्र दिलीप भोई आणि राहूल भोई हे दोन युवक बटाट्याचे बोळके घेऊन 1992 पासून बटाटे विक्री करतांना दिसतात.

रोजच्या गरजेच्या लढाईत बटाट्याचं बळ

या दोघांनी अनेक वर्षांपासून आपला चरितार्थ चालवण्यासाठी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. हाताला दुसरं काही काम नाही, म्हणून गरिबीच्या गालात जाताना त्यांनी या छोट्या व्यवसायातून मोठा संघर्ष उभारला आहे. उन्हाची तगमग, अंगावर कोसळणारा घाम आणि तरीही संध्याकाळपर्यंत झालेली थोडीफार विक्री… यामुळे रात्रीचं जेवणही शंकेच्या अधीन.
सध्या बटाटा २५ ते ३० रुपये किलो दराने विकला जात असून, उपवासाच्या एकादशी दिवशी त्याची मागणी अधिक होती. बाजारात भाज्यांचे दर वाढले असले तरी बटाट्याची लोकप्रियता अजूनही कायम आहे.

बटाट्याचं सामाजिक स्थान आणि सांस्कृतिक महत्व

बटाटा – हा केवळ एक कंद नाही, तर तो एक भावना आहे. घराघरात उपासाच्या दिवशी हाच पदार्थ पूजनीय मानला जातो. ज्याच्या शिवाय खमंग नाश्ता, रस्सेदार भाजी, चटकदार समोसा, गरमागरम वडा-पाव, पावभाजी, डोसा – हे सर्व अपूर्ण वाटतात. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या स्वयंपाकघरात बटाटा मानाचं स्थान राखून आहे. भाव वाढले तरी मागणी घटलेली नाही – हीच त्याच्या लोकप्रियतेची साक्ष आहे.

साहित्य, आयुर्वेद, आणि इतिहासातही बटाट्याचं स्थान

हिंदी साहित्यिक प्रेमचंद यांच्या कथांमध्येही बटाट्यावर गुजराण करणाऱ्या गरीब कुटुंबांचा उल्लेख आहे. पु. ल. देशपांडे यांच्या “बटाट्याची चाळ” या पुस्तकाने त्याला हास्यरसात सुद्धा स्थान दिलं. आयुर्वेदातही बटाट्याचा उपयोग सौंदर्यवर्धनासाठी मानला जातो. म्हणजेच तो केवळ अन्न नाही, तर इतिहास, साहित्य आणि संस्कृतीतला एक घटक बनलेला आहे.

शेवटी एवढंच…

अमळनेरातील दिलीप व राहूलभोई सारख्या अनेक बेरोजगार युवकांनी हातातील साधनातून कष्टाचा रस्ता निवडला आहे. बटाट्याच्या बोळक्यावर जगण्याची आशा ठेवून ते दररोज एक नवीन सूर्योदय अनुभवतात.
महागाई कितीही वाढो, सरकारकडून योजना कितीही जाहीर होवोत – पण अशा जिद्दी माणसांचं जीवन हेच खऱ्या अर्थाने “संकटातही समाधान शोधण्याचा” मूर्तिमंत नमुना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *