“मानवी अस्तित्वासाठी शस्त्र निर्मितीवर निर्बंध घाला, पृथ्वीचे संरक्षण करा–सामाजिक SAVE the WORLD या संस्थेच्या वतीने पंतप्रधानांना पत्राद्वारे कळकळीचे आवहन
![]()
“मानवी अस्तित्वासाठी शस्त्र निर्मितीवर निर्बंध घाला, पृथ्वीचे संरक्षण करा–SAVE the WORLD या संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांचे पंतप्रधानांना पत्राद्वारे कळकळीचे आवहन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आम्ही अत्यंत चिंता व्यक्त करत, आपल्या कडे एक विनम्र आवाहन करत आहोत.
ही पृथ्वी एक सुंदर देणगी आहे- अप्रतिम निसगनि सजलेली. मानवजातीने येथे शतके आनंदाने जीवन जगले आहे. परंतु आज, अधिक सत्ता, अधिक मालमत्ता आणि अधिक वर्चस्व या अमयदि लालसेंमुळे, माणूस स्वतःच्या विनाशाकडे वाटचाल करत आहे.
सत्ताकांक्षेच्या या स्पर्धेमध्ये देश विध्वंसक शस्त्रांकडे वळत आहेत. इतरांच्या जीवित वा कल्याणाची कोणतीही पर्वा न करता, अण्वस्त्रांचा वापर मानवाच्या अस्तित्वालाच धोक्यात आणू लागला आहे. निसर्गाचा समतोल ढासळू लागला आहे. आणि मानव, प्राणी, वनस्पती सारे जीव धोक्यात आले आहेत.
आम्ही आपल्याला कळकळीची विनंती करतोः कृपया युद्धाचा हा भीषण मार्ग थांबवा. विध्वंसक शस्त्रांची निर्मिती व वापर थांबवावा. आपण सर्वांनी मिळून शांततेचा, प्रेमाचा आणि परस्पर सन्मानाचा मार्ग स्वीकारुया. आपण समतेंने जगूया आणि इतरांनाही जगण्याची संधी देऊया.
आपण सगळे या पृथ्वीवर थोड्याच काळासाठी आहोत. याची जाणीव ठेवून भविष्यातील पिढ्यांसाठी पृथ्वीचे रक्षण करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. जी शस्त्रे पृथ्वीचा संपूर्ण नाश करु शकतात, ती निर्माण व वापर करून आपण आपल्या पुढील पिढ्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करत आहोत.
कृपया, हा भयंकर युद्धमार्ग थांबवा. आपण शांततेने जगूया आणि इतरांनाही जगू द्या असे पत्र मेलद्वारा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाSAVE the WORLD या संस्थेच्या वतीने
संदिप घोरपडे (सामाजिक कार्यकर्ते) व
प्रशांत निकम (सामाजिक कार्यकर्ते) यांनी पाठवले आहे..

