“दहिवद मधील 43 वर्षानंतरचा स्नेह मेळावा: शिक्षण आणि संस्कृतीचा अनुभव ताजा करणारा”
1 min read

“दहिवद मधील 43 वर्षानंतरचा स्नेह मेळावा: शिक्षण आणि संस्कृतीचा अनुभव ताजा करणारा”

Loading

“दहिवद मधील 43 वर्षानंतरचा स्नेह मेळावा: शिक्षण आणि संस्कृतीचा अनुभव ताजा करणारा”

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी दहीवद येथील माध्यमिक शालेत दहावी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला. हा मेळावा ४३ वर्षांनंतर पार पडला, ज्यामुळे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये आनंद व उत्साह संचारला.
हा कार्यक्रम पोलिस उपअधीक्षक वासुदेव देसले यांच्या संकल्पनेतून रविंद्र मोरे, कैलास महाराज, आणि विजय वाणी यांच्या प्रयत्नातून झाला. स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षपदी सेवा निवृत मुख्याध्यापक श्री यू ओ चौधरी सर होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सौ सुषमाताई वासुदेव पाटील (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर), संस्थेचे चेअरमन श्री जयवंत पाटील, आणि संस्थेचे सचिव श्री सुभाष पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभापूर्वी, शाळेतील सर्व सेवानिवृत्त गुरुजनांचा यथोचित सत्कार करण्यात आला. वासुदेव देसले यांनी यांतील गुरुजनांना पुष्पहार, शाल, श्रीफल, स्मृतिचिह्न, ताम्र दीप, आणि साड़ी भेट दिली. याशिवाय, काही माजी विद्यार्थिनींनाही सन्मानित करण्यात आले. सौ सुरेखा पाटील, सौ रत्न प्रभा सोनार, सौ प्रतिभा देशमुख, सौ अनुपमा कांकरिया, आणि सौ राजश्री अढ़ाले यांना सन्मानित केले गेले.

 

 

 

 

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस, यावेळी काही गुरुजनांनी विद्यार्थ्यांना सोडून गेल्यामुळे त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. कै श्री कोल्हे सर, कै श्री एस डी पाटील सर, श्री प्रभाकर पाटील सर, कै श्री सोनवने सर, कै श्री मधुकर राडे सर, कै श्री मधुकर सोनार सर, कै श्री शिम्पी सर यांना श्रद्धांजलि देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
कार्यक्रमानंतर, शालेचे सचिव श्री सुभाषराव हिम्मतराव पाटील यांनी वासुदेव देसले यांचे पोलिस उपाधीक्षकपदावर पदोन्नती झाल्याबद्दल सन्मान केला. वासुदेव देसले यांना पुष्पगुच्छ, शाल, आणि श्रीफल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सर्व माजी विद्यार्थ्यांनी ४३ वर्षांनी एकत्र येत आपल्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला. चौधरी सर आणि लाबोळे सर यांनी माजी विद्यार्थ्यांना पुन्हा शिकवतांना गणिताचे विषय आठवण करून दिले.
हा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी वासुदेव देसले, रविंद्र मोरे, कैलास पाटील, विजय वाणी आणि राजेंद्र पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाने सर्व उपस्थितांना आनंदित केले आणि शाळेतील खूप महत्वाच्या आठवणी जागवल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *