1 min read

खासदार उन्मेष पाटील यांनी राजीनामा द्यावा-भारत जोडो अभियान अमळनेर

Loading

खासदार उन्मेष पाटील यांनी राजीनामा द्यावा-भारत जोडो अभियान अमळनेर

अमळनेर येथील पाडळसे धरणाला केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाली असती तर केंद्राच्या बळीराजा सिंचन योजनेतून निधी मिळाला असता असे म्हणणाऱ्या खासदारांनी केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळविण्यासाठी कोण आमदार ,कोण खासदार कमी पडले. आमदार ,खासदार कोणत्या पक्षाचे होते, याचा उल्लेख खासदारांनी अमळनेर येथील पत्रकार परिषदेत केला नाही. 2014 पासून राज्यात व केंद्रात भाजप सरकार आहे व मा.उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिले नाही हा आरोप खासदार उन्मेष पाटील यांना शोभत नाही .मा उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिले नाही ,खानदेश वर अन्याय केला ,तेव्हा खासदारांनी आंदोलन का केले नाही? तत्कालीन जलसंपदा मंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री यांना खासदारांनी किती वेळा पत्र व्यवहार केला हे त्यांनी जाहीर केले नाही .2014 ते 2019 या काळात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन असताना ही पाडळसे धरण पूर्ण झाले नाही ,याचा उल्लेख खासदार का करीत नाहीत.अमळनेर तालुक्यात सिंचन फक्त पंधरा टक्के आहे हे सांगणाऱ्या खासदार उन्मेष पाटील यांनी पाडळसे धरणाच्या प्रश्नाला फारसे महत्त्व दिले नाही. शेतकऱ्यांच्या वेदनाशी नाते जोडले नाही. व धरणाला राजकीय आश्रय मिळवून दिला नाही.
शासकीय अधिकाऱ्याकडून सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी अडचणी निर्माण होतात .22 स्मरणपत्रे पाठविली हे सांगणाऱ्या उन्मेष पाटलांचे अधिकारी ऐकत नाही हीच त्यांनी जाहीर कबुली दिली आहे. मग एक तर अधिकाऱ्यांना सरळ करा किंवा शेतकऱ्यांसाठी आंदोलन करा नाहीतर आपल्या खासदारकीचा राजीनामा द्या यापैकी कोणताही पर्याय खासदार निवडत नाही याचे आश्चर्य वाटते.
संकल्प चित्रात बाबत चुकीची माहिती देण्यात आली. संकल्प चित्रावरून जे नुकसान झाले त्यास कोण जबाबदार आहे? याची चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे यासाठी खासदार काय करणार आहेत?
शेतकरी म्हणून मी आंदोलनात सहभागी होईल. हे सांगणाऱ्या उन्मेष पाटील यांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा .मग शेतकरी म्हणून आंदोलनात सहभागी व्हावे. उच्च विद्याविभूषित ,शेतकरी खासदार असताना अमळनेरच्या पत्रकार परिषदेत मी खासदार म्हणून पाडळसे धरणासाठी काहीही करणार नाही व मी लायक लोकप्रतिनिधी नाही हीच जाहीर कबुली खासदारांनी पत्रकार परिषदेत दिली आहे
पाण्याच्या महत्वाच्या प्रश्नाबाबत शेतकरी व उद्योग विरोधी भूमिका घेणाऱ्या उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारत जोडो अभियान अमळनेर .दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी अमळनेर प्रांत कार्यालयासमोर अकरा वाजता धरणे आंदोलन करणार आहे तरी सर्व पाडळसे धरण प्रेमींनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन भारत जोडो अभियान चे प्रमुख प्रा अशोक पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *