जखमी हरणाचे आर्डीच्या तरुणांने वाचवले प्राण—–
![]()

जखमी हरणाचे आर्डीच्या तरुणांने वाचवले प्राण—–
अमळनेर – तालुक्यातील आर्डी शिवारात हरणाचे कळप दिसून येतात. सध्यस्थीतीत पाऊस लांबल्याने आज ता.20 रोजी पाण्याच्या भटकंतीत फिरत असताना कुत्र्यांनी हल्ला चढविल्याने हरीण जखमी झाले.
आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास आर्डी गावातून भूषण रामलाल वानखेडे या तरुणाने आर्डी शिवारातील जंगलात हरीण जखमी अवस्थेत पडले असल्याचे दिसून येताच अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मिलिंद भामरे यांना संपर्क केला. मिलिंद भामरे यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना घटनेबाबत कळवुन लागलीच वनपाल प्रेमराज योगराज सोनवणे यांना फोन द्वारे कळवून जखमी हरणाच्या मदतीसाठी आर्डी गावाला वनपाल सोनवणे व वनरक्षक रामदास वेलसे हे ताबडतोब आर्डी गावी पोहोचून जखमी हरणास जंगलात शोध घेऊन जखमी हरणावर आधी प्रथमोपचार केले. प्रथमोपचार केल्यावर एका खाजगी प्याजो रिक्षाने अमळनेर येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून हरणाला चालता येत नसल्याने खाजगी वाहनाने अमळनेर येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात आणीत उपचार करण्यात आले. आर्डी येथील भूषण वानखेडे या तरुणाच्या सतर्कतेने व पोलीस हवालदार मिलिंद भामरे, गणेश पाटील व वनपाल सोनवणे व वेलसे यांच्या सहकार्याने जखमी हरणीला जीवदान दिले आहे.
चौकट — पावसाळा लांबल्याने वण्य प्राण्याचे पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. त्यातच मागील आठवड्यात पाण्याच्या शोधात असलेले हरीण विहीरीत पडल्याची घटना घडली होती. वण्य प्राण्यासाठी जंगल शिवारात जागोजागी पानवठे बनविणे आवश्यक आहे. वनविभाग खात्याने याकडे लक्ष घालून जागोजागी पानवठे तयार केल्यास वन्य प्राण्यांची भटकंती थांबेल असे वन्यप्रेमी यांच्यात बोलले जात आहे.

