शेतकरी उपाशी मरत असतांना प्रशासकीय बिल्डिंगसाठी उपोषण करण्यापेक्षा शेतकरी हितासाठी उपोषण करावे- आम आदमी पार्टी
![]()
शेतकरी उपाशी मरत असतांना प्रशासकीय बिल्डिंगसाठी आंदोलन का करावे,…
आमदारांनी शेतकरी हितासाठी उपोषण करावे! /आप चे आवाहन

प्रशासकीय इमारती साठी उपोषण करू म्हणणाऱ्या आमदारांनी शेतकऱ्यांचा कापूस घरात पडला आहे त्या साठी उपोषण करायला हवे.. प्रशासकिय बिल्डिंग आज ना उद्या झाली तरी काय फरक पडतो? असा सवाल करून आम आदमी पार्टीने नव्या विषयास हात घातला आहे.
तालुका व राज्यातील सर्व ‘दादासाहेबांनी’ शेतकऱ्यांच्या कापूस घरात पडलेला असून त्या संदर्भात विचार केला तर दुबारा पेरणीसाठी शेतकरी उभा राहू शकतो अन्यथा शेतकरी उध्वस्त होईल! आपण लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही लक्ष दिल तरच शेतकरी वाचेल. दादासाहेब, शेतकरी वाचवा महाराष्ट्र वाचवा!
तमाम अमळनेर जनतेचे शेतकरी पुत्र आमदार अनिलदादा पाटील यांनी प्रशासनाला शेतकरी संबंधीत मका, कापूस, कांदा, या सर्व पिकांचा प्रश्न विचारावा आणि शेतकऱ्यांच्या समस्या प्रथम नागरिक असल्या कारणाने सोडवण्यात याव्यात, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, यांचे येत्या 16 जून रोजी अमळनेर मध्ये आगमन होत असताना, त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे सुद्धा 16जुन रोजी अमळनेर नगरीत येत आहेत त्यांनी सुद्धा शेतकरी हिताचे सर्व प्रश्न लक्षात घेऊन येत्या पेरणीच्या अगोदर, आमच्या तमाम शेतकरी बांधवांच्या प्रश्नावरती तोडगा काढावा, असे अमळनेर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने तसेच तालुका आम आदमी पार्टी सर्व पदाधिकारी व सर्व सदस्यांच्या मार्फत विनंती करण्यात येत आहे. असे पत्रक अंमळनेर आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे

