NEET-UG २०२६ पेपरफुटी घोटाळा : लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड!”,  लातूर कनेक्शन गडद; नामांकित RCC क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या जाळ्यात , पेपर १० दिवस आधीच हातात; मोबाईलमधील पुरावे डिलीट करूनही सीबीआयने डेटा रिकव्हर केला
1 min read

NEET-UG २०२६ पेपरफुटी घोटाळा : लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड!”, लातूर कनेक्शन गडद; नामांकित RCC क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या जाळ्यात , पेपर १० दिवस आधीच हातात; मोबाईलमधील पुरावे डिलीट करूनही सीबीआयने डेटा रिकव्हर केला

Loading

“NEET-UG २०२६ पेपरफुटी घोटाळा : लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड!”

लातूर कनेक्शन गडद; नामांकित RCC क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या जाळ्यात

पेपर १० दिवस आधीच हातात; मोबाईलमधील पुरावे डिलीट करूनही सीबीआयने डेटा रिकव्हर केला

पुणे प्रतिनिधी

देशभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या NEET-UG २०२६ पेपरफुटी घोटाळ्यात आता महाराष्ट्रातील लातूर कनेक्शन समोर आल्याने शिक्षणविश्व हादरले आहे. नाशिक आणि पुण्यानंतर आता लातूरमधील अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या RCC कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केली आहे.

सीबीआयच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ३ मे रोजी होणाऱ्या NEET परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि त्याची अचूक उत्तरे तब्बल १० दिवस आधी म्हणजेच २३ एप्रिल २०२६ रोजीच मोटेगावकर यांच्या हाती पोहोचली होती. ही बाब समोर आल्यानंतर देशभरातील लाखो विद्यार्थी, पालक आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संताप उसळला आहे.

तपास यंत्रणांच्या मते, हा केवळ पेपरफुटीचा प्रकार नसून, पैशाच्या जोरावर गुणवत्ता विकणाऱ्या शिक्षण माफियांचा मोठा संगनमत घोटाळा असल्याचे चित्र समोर येत आहे.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; पण सीबीआयचा फॉरेन्सिक तपास ठरला निर्णायक

CBI ने तपासाची सूत्रे हाती घेताच, कारवाईची चाहूल लागताच प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी आपल्या मोबाईलमधील प्रश्नपत्रिका, उत्तरे, चॅट्स आणि संशयास्पद डेटा डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती समोर आली आहे.

मात्र, सीबीआयने त्यांचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून तपास केला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा पुन्हा रिकव्हर करण्यात आला. त्यामध्ये लीक झालेली प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि अनेक संशयास्पद संवाद सापडल्याने तपासाला मोठी दिशा मिळाली आहे.

विद्यार्थ्यांचे भविष्य विकणारे रॅकेट?

तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली असून, मोटेगावकर यांनी हा फुटलेला पेपर केवळ स्वतःपुरता मर्यादित ठेवला नाही, तर आर्थिक व्यवहार करून अनेक विद्यार्थ्यांना व मध्यस्थांना तो पुरवल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात विवेक पाटील नावाच्या व्यक्तीचेही नाव समोर आले असून, त्याची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. सीबीआय आता आर्थिक व्यवहार, कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि कोचिंग नेटवर्कची सखोल चौकशी करत आहे.

ही केवळ पेपरफुटी नाही; लाखो कष्टकरी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची हत्या आहे!”

देशातील सर्वात प्रतिष्ठित वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा पेपर अशा पद्धतीने फुटल्याने शिक्षण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गरीब, ग्रामीण आणि मेहनती विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास करून मिळवायची संधी काही पैशांच्या लालसेपोटी विकली जात असल्याचा आरोप संतप्त पालकांकडून होत आहे.

विद्यार्थी संघटना, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली असून, “पेपर माफियांना फाशी द्या”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना माफी नाही” अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

या प्रकरणातील समोर आलेली प्रमुख नावे

प्रा. शिवराज मोटेगावकर – संचालक, RCC कोचिंग क्लासेस, लातूर

विवेक पाटील – संशयित मध्यस्थ / संपर्क व्यक्ती

 

सीबीआयचा तपास आणखी मोठ्या रॅकेटकडे?

सीबीआय आता या प्रकरणामागील संपूर्ण साखळी उघड करण्याच्या तयारीत असून, देशभरातील काही कोचिंग नेटवर्क, मध्यस्थ, तांत्रिक सहकारी आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पालकांच्या संतप्त प्रतिक्रिया

१) सुनील पाटील (पालक, जळगाव)
“आमची मुलं दिवस-रात्र अभ्यास करून परीक्षा देतात आणि काही लोक पैशाच्या जोरावर पेपर विकत घेतात, हे अत्यंत संतापजनक आहे. अशा लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.”

 

२) मंगला चौधरी (पालक, धुळे)
“गरीब कुटुंबातील मुलं मेहनतीवर विश्वास ठेवून पुढे जातात. पण अशा पेपरफुटीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास तुटतो. सरकारने या शिक्षण माफियांना कायमचं संपवलं पाहिजे.”

३) गोकूळ पाटील केंद्रप्रमुख सेवानिवृत्त अमळनेर)
“NEET सारख्या राष्ट्रीय परीक्षेत जर पेपर आधीच विकले जात असतील, तर सामान्य विद्यार्थ्यांनी न्याय कुठे मागायचा? लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी हा थेट विश्वासघात आहे.”

४) वैशाली शिंदे (पालक, नाशिक)
“आमची मुलं तणाव, स्पर्धा आणि मानसिक दबाव सहन करून अभ्यास करतात. आणि काही लोक पैसे घेऊन पेपर वाटत असतील, तर ही संपूर्ण व्यवस्थेची लाजिरवाणी बाब आहे.”

५) दिलीप पवार (पालक, पुणे)
“पेपरफुटी करणारे आणि त्यांना मदत करणारे कोणत्याही स्तरावरील असोत, त्यांच्यावर देशद्रोहासारखी कठोर कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना माफी नसावी.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *