ग्रंथालय व्यवस्थेमधील राजहंस सतीश पाटील-सदस्य- महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती मुंबई
![]()
ग्रंथालय व्यवस्थेमधील राजहंस
सतीश पाटील-सदस्य- महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती मुंबई
अमळनेर प्रतिनिधी
कोणत्याही औपचारिक शिक्षण व्यवस्थेमध्ये मग ती शाळा असो महाविद्यालय असो विद्यापीठ असो किंवा ग्रंथालय असो ज्ञानदानाचे कार्य सुरू असते या ज्ञानदानाच्या कार्यात जे प्रमुख घटक मानले जातात त्यामध्ये शिक्षक विद्यार्थी व ग्रंथपाल परंतु सार्वजनिक ग्रंथालयाचा ग्रंथपाल हा महत्त्वाचा घटक असूनही तो कायम दुर्लक्षित राहतो तो म्हणजे सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथपाल विविध प्रकारच्या आणि विविध स्वरूपातील वाचन साहित्य मध्ये ज्ञान संचित करून ठेवले आहे कारण ग्रंथपाल हा विद्यार्थी पालक व साहित्य प्रेमी पुस्तक प्रेमी ग्रंथप्रेमी इत्यादी अनेक प्रकारच्या भूमिका पार करत असतो परंतु दुदैवाची गोष्ट अशी आहे की आपल्या शिक्षण व्यवस्थे मध्ये आणि समाज व्यवस्थेमध्ये सुद्धा ग्रंथपालाचे महत्व अजून तितकेसे ओळखले गेलेले नाही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा ग्रंथपाल यांच्याबाबत पूर्णपणे उदासीनता दिसून येते महाराष्ट्रा पुरते बोलायचे असल्यास आपल्या शासनाने सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल यांना अजून न्याय मिळालेला नाही सार्वजनिक ग्रंथालय यांच्याबाबत पूर्णपणे उदासीनता दिसून येते महाराष्ट्र पुरते बोलायचे असल्यास आपल्या शासनाने सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल यांना अजून न्याय मिळालेला नाही सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथपाल शहरी व ग्रामीण भागात कमी पगारात सुद्धा उत्तम पद्धतीने सेवा देत आहे तरी या कर्मचाऱ्यांना उपासमारीची वेळ व आत्महत्या सारखे प्रसंग यांच्यावर येत आहेत अनेक संघटनांनी बऱ्याच वेळेस पाठपुरा करून सुद्धा योग्य न्याय ग्रंथपालांना मिळत नाही ग्रंथपाल हा घटक तंत्रज्ञान युगात माहितीचा महासागर आणि उपयुक्त ग्रंथ व ग्रंथालयीन कौशल्य ग्रंथपालाने शास्त्रीय दृष्टीने विकसित झालेला ग्रंथपाल हा फक्त पुस्तकांचा रक्षक नसून तो ज्ञानाचा पूल भरणारा आणि वाचन संस्कृतीचा प्रसारक आहे ग्रंथपाल हा शिक्षण व्यवस्थेमधील एक राजहंस म्हटलं तरी उत्तमच ठरेल १२ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा केला जातो ग्रथपाल हा अचूक आणि विश्वासार्थ माहिती वाचकपर्यंत पोहोचवीत असतो या अर्थाने ग्रंथपाल हा खरच राजांसह असून परंतु त्यांना ओळखण्यास आणि त्यांचे कार्य मान्य करण्यास मात्र अजूनही शासन व्यवस्था त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असून शासनाने त्यांच्या बाबतीत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावे ही राष्ट्रीय ग्रंथपालदिना निमित्तत शुभेच्छा

