उर्वेश साळुंखे यांच्या संकल्पनेतून सायकलवर प्रवास करून पर्यावरण वाचवा असा संदेश ३० हजार नागरिकांन पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न….
![]()
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते शुभारंभ…!!

उर्वेश साळुंखे यांच्या संकल्पनेतून सायकलवर प्रवास करून पर्यावरण वाचवा असा संदेश ३० हजार नागरिकांन पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न….
बुधगाव येथील रहिवासी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उर्वेश साळुंखे यांनी पर्यावरण वाचवा हे अभियान सायकलवर प्रवास करून ३० हजार नागरिकांन पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारं आहे. ह्या अनोख्या पद्धतीच्या *अभियानाचे शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांच्या करण्यात आले.* राष्ट्रवादी हात, पर्यावरणाला साथ ह्या उपक्रमाची संकल्पना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे व मा. जिल्हाअध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी ,जळगाव *मा. सुनील (आबा)* पाटील यांची होती. या प्रसंगी माजी मंत्री मा.अरूणभाई गुजराती,मा. गुलाबराव देवकर, अमळनेरचे आमदार मा. अनिल पाटील, माजी आमदार कैलास पाटील, मा. आमदार साहेबराव पाटील चो.का.सा. माजी चेअरमन मा. घनश्याम पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण,राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग प्रदेशाध्यक्ष मा. उमेश पाटील, राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग प्रदेश समन्वयक सौ. रिता बाविस्कर मा. सभापती डि.पी. साळुंखे सर, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मनोज पाटील, मा. युवक अध्यक्ष मा. दिपक सोनवणे, मा. वलय पाटील, मा. हर्षल साळुंखे पत्रकार बांधव व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

