“उद्यमनगर युवक बेपत्ता; रत्नागिरी पोलिस तपासात गतीशून्य”
![]()
“उद्यमनगर युवक बेपत्ता; रत्नागिरी पोलिस तपासात गतीशून्य”
रत्नागिरी/
रत्नागिरी मधील सामाजिक कार्यकर्त्या सौ फैमिदा सुर्वे यांचे पती अली फारुक सुर्वे हे गेल्या सहा दिवसापासुन बेपत्ता आहेत. रितसर तक्रार देण्यात आली आहे.रत्नागिरी पोलिसांना अध्याप कसलाच ठाव ठिकाणा मिळत नाही, लोकेशन मिळत नाही,पोलिस तपास पुढे सरकत नाही असेच चित्र दिसत आहे. बेपत्ता व्यक्तिचा शोध घेण्यात तत्परता दिसत नाही असे मत बेपत्ता व्यक्तीच्या कुटुंबाने व्यक्त केले आहे. पूढील चोवीस तासात तपासाला गती आली नाही तर, सर्व कुटुंब उपोषणास बसणार आहेत असेही सांगितले.खंडाळा येथून सुद्धा दोन बेपत्ता व्यक्ति झाल्या होत्या,त्यात संबंधित पोलीसानी तपास तत्परतेने न हाताळल्याने त्यांचा खून झाल्याचे दिसून आले.अशा घटना जर आता रत्नागिरी वाढत असतील तर मग सामान्य माणसाचे काय होणार?या बेपत्ता तरुणाचे पोलिसांनी लवकरात लवकर शोध न लावल्यास सुर्वे परिवाराकडुन आमरण उपोषण करण्यात येईल अशा इशारा सुर्वे कुटुंबाकडून देण्यात आला आहे.

