पाचव्या राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन: अमळनेरमध्ये सांस्कृतिक मेजवानी!
![]()
पाचव्या राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन: अमळनेरमध्ये सांस्कृतिक मेजवानी!
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर अहिराणी साहित्य परिषद धुळे आणि धनदाई माता एज्युकेशन सोसायटी अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 व 31 मार्च 2025 रोजी पाचव्या राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे एका वर्षांपूर्वी अमळनेर येथे यशस्वी झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या यशानंतर, रसिकांना खानदेशच्या गोड अहिराणी भाषेतून कथा, कविता, परिसंवाद व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.
अमळनेरच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हे संमेलन होणार असून, खानदेशची बोलीभाषा अहिराणीचा जागर या निमित्ताने होत आहे. संमेलनात ग्रंथदिंडी, शोभायात्रा, वैविध्यपूर्ण कवितांचे वाचन, खानदेशच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची प्रदर्शनी, परिसंवाद आणि कहाण्या यांचा समावेश असेल. याशिवाय, संपूर्ण जगभरातील अहिराणी गाण्यांचा समावेश असणारे नृत्य प्रस्तुत केले जाईल.
अहिराणी साहित्य क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या साहित्यिकांना ‘अहिराणी भूषण पुरस्कार’ आणि अहिराणीचा प्रचार प्रसार करणाऱ्या कलाकारांना ‘अहिराणी गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या संमेलनात अहिराणी भाषेचा विस्तार, डॉ. रमेश सूर्यवंशीांच्या शब्दकोशाची माहिती, तसेच ‘ताई मी कलेक्टर व्हायनु’ सारख्या पुस्तकांद्वारे व्यक्त होणारे आयएएस अधिकारी राजेश पाटील उपस्थित असणार आहेत.
गुढीपाडव्याच्या दिवशी, 30 मार्च रोजी संमेलनाचा प्रारंभ सायंकाळी 4 वाजता होईल, आणि 31 मार्च रोजी ईद निमित्त सुट्टी असणार आहे. त्यामुळे दोन्ही दिवशी सहपरिवार जास्तीत जास्त रसिकांनी या सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घेण्याचे आवाहन अमळनेरचे साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.
सोबतच, अहिराणी साहित्य परिषद धुळेचे अध्यक्ष भगवान पाटील, सचिव प्रभाकर शेळके, धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. डी. पाटील, उपाध्यक्ष के. डी. पाटील, युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, प्राचार्य डॉ. लिलाधर पाटील, अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, वसुंधराताई लांडगे, गोकुळ बागुल, डॉ. कुणाल पवार आणि डॉ. दत्ता ठाकरे यांचे योगदान विशेष महत्त्वाचे ठरले आहे.
या संमेलनाद्वारे खानदेशी संस्कृतीचे महत्व आणि अहिराणी भाषेचा प्रभावी प्रचार करण्याची संधी उपलब्ध होईल.

