1 min read

लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेतर्फे आद्य क्रांतिवीर समशेरसिंग पारधी स्मारकास आदरांजली

Loading

लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेतर्फे आद्य क्रांतिवीर समशेरसिंग पारधी स्मारकास आदरांजली

समशेरसिंग पारधी हे आदिवासी पारधी समाजाचे क्रांतिकारक होते इंग्रजांविरुद्ध झालेल्या १८५७ च्या लढाईत त्यांनी स्वतःच्या पारधी समाजाचे नेतृत्व केले होते द्वारकेच्या ओखा बेटावर वाघरी , वाघेर जमातीचे लोक राहत होते त्यांचे स्वताचे संस्थान होते या संस्थांनसाठी गायकवाड , इंग्रज व वाघेर यांच्यात १८०३ ते १८५८ पर्यंत संघर्ष सुरू होता १८५८ मध्ये वाघेरानी इंग्रजांचे जहाज लुटले होते इंग्रजांनी त्यांचा राजा नारायण माणेक ची हत्या केली १८४८ मध्ये पुन्हा वाघेर व जोधा माणेक यांनी ते बेट इंग्रजांच्या ताब्यातून परत घेतले नंतर पुन्हा इंग्रज व गायकवाड यांनी जोधा माणेक ला मारून बेट ताब्यात घेतले १८१८ मध्ये वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी समशेरसिंग पारधी यांनी स्वतःचे स्वतंत्र संस्थान बनवले होते राजा गंगू बापू मकवाना , माणेक वाघेर , वाघरी सेनापती यांची सोमनाथ जवळ मिठापुर येथे स्वराज्य साठी बैठक घेतली मराठा व इंग्रजांप्रमाणे स्वतंत्र संस्थान निर्माण केले समशेरसिंग जवळ ४ ते ५ हजार पारधी समाजाचे सैनिक होते पारधी , फासेपारधी , वाघेर , काठेवाडी समाजाचे लोक त्यांना मुखीया मानायचे इंग्रजांनी हल्ला केल्यानंतर समशेरसिंग यांच्याजवळ बंदुका नव्हत्या तरी दगड , भाले , काठ्या , तिर , झाडाच्या फांद्यांनी इंग्रजांशी लढाई केली होती इंग्रजांविरुद्ध आपला टिकाव लागणार नाही हे माहीत असतानाही त्यांनी प्रखर भाषण करून स्वतंत्र संस्थांनचे विचार मांडून १ जानेवारी १८५७ ला काठेवाडी मध्ये बैठक घेऊन रणनीती आखली व लोक गोळा करून “जिवमं ,जीवछं ततपर लढो ,देवींना कृपेथी आपळच लढाई जिकणारा छं , आपळ स्वतानु राज्य मळसे ” असे युद्धाचे आवाहन केले जानेवारीत इंग्रजांनी द्वारकेवर बंदूक तोफांसह हल्ला केला तेव्हा गायकवाडाची एक टोळी समशेरसिंगला मिळली आणि समशेरसिंगने बंदूक तोफा याना न घाबरता इंग्रजांवर समुद्रात बुडून , पपईच्या झाडाची पोकळ फांदीने श्वास घेऊन पाण्यात राहून , कधी बेटावरून फास टाकून तर कधी झाडांवरून हल्ले करून परेशान करून टाकले पत्नी , भाऊ , मुलगा मारला गेल्या नंतरही हतबल न होता ,तलवार ,बाण , भाला , दगडे मारून हल्ले केले १८५८ ला त्याला व गंगू बापू मकवना , वाघेरा माणेक याना इंग्रजांनी पकडून १ एप्रिल १८५८ रोजी क्रांतिवीर समशेरसिंग पारधी यांना फाशी दिली अशा या महान आदिवासी क्रांतिकारकाला आज सकाळी लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेतर्फे पन्नालाल मावळे सह पारधी समाजाचे जेष्ठ नेते मधुकर चव्हाण, संजय पवार, अविनाश पवार, हेमंत दाभाडे, राहूल मास्तर, धनराज पारधी, प्रकाश पारधी, गणेश चव्हाण, शांताराम चव्हाण, पिंटू साळुंके, किरण सोनवणे, पवन चव्हाण, प्रदिप दाभाडे, सागर भाऊ,अजय दाभाडे, संदीप पारधी, राहूल पारधी, रोहित चव्हाण,अजय पारधी, गोरख चव्हाण, पुंजु पारधी, किशोर चौधरी व कार्यकर्ते क्रांतिवीर समशेरसिंग पारधी स्मारकाजवळ एकत्र जमून प्रतिमेस पारधी समाजाचे श्रद्धास्थान भगत दंगल चव्हाण यांच्या हस्ते पुजा करत पुष्पहार टाकून शहिद क्रांतिवीर समशेरसिंग पारधी स्मारकास आदरांजली वाहण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *