1 min read

पत्रकार शशिकांत वारिशे हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार,उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची लक्षवेधीवर विधासभेत घोषणा

Loading

पत्रकार शशिकांत वारिशे हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार

उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची लक्षवेधीवर विधासभेत घोषणा

मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचेकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत

मुंबई – राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा खटला जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालविण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे.. विधानसभेत या विषयावरील लक्षवेधीला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही कोणाला पाठिशी घालणार नाही किंवा सोडणार ही नाही हे निक्षूण सांगितले.. अतुल भातखळकर, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, अजित पवार आणि अन्य सदस्यांनी ही लक्षवेधी मांडली होती.. त्याला उत्तर देताना, देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी नि:पक्षपणे व्हावी यासाठी डीजींना लक्ष घालण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले.. शशिकांत वारिशे यांचा कुटुंबाला २५ लाखांची मदत देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.. शशिकांत वारिशे हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने सातत्यानं केली होती.. ती आज मान्य झाल्याने हे परिषदेचे आणखी एक यश मानले जात आहे.. सरकारच्या या निर्णयाचे परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी स्वागत केले आहे.. हा पत्रकारांच्या एकजुटीचा विजय असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *